कुणा कुणास सांगते मनात दु:ख साचले
नयन मूक बोलले उरात दु:ख साचले
फुलात कोवळा तुरा किती दिमाख दावतो
कुठे कळे फळासही तळात दु:ख साचले
मनूस हाव बघ सुटे उगाच भुईस खोदतो
झरे मुकाट थांबता जलात दु:ख साचले
वधू नवीन घरी रमे पतीस प्रेम देतसे
सखीस आठवू कशी क्षणात दु:ख साचले
सतावते रात्र ही मनात याद दाटते
मनास जाच होत अन् तनात दु:ख साचले
#. सागर प्रकाश
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
No comments:
Post a Comment