Saturday, May 17, 2008

प्रकाश क्षीरसागर यांना कवी बी पुरस्कार प्रदान


चाळीसागव ः येथे झालेल्या अंकुर साहित्य संघातर्फे येथे झालेल्या चाळीसाव्या अंकुर राज्य मराठी साहित्य संमेलनात दै. "गोमन्तक'चे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना त्यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहासाठी प्राप्त झालेला "कवी बी पुरस्कार' प्रदान करताना संमेलनाध्यक्ष प्रा. जवाहर मुथा व सकाळ न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कांबळे व इतर. प्रकाश क्षीरसागर यांना कवी बी पुरस्कार प्रदान पणजी, ता. १७ ः चाळीसगाव (जि. जळगाव) येथे अलीकडेच झालेल्या अंकुर साहित्य संघाच्या राज्य मराठी साहित्य संमेलनात दै. "गोमन्तक'चे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना "कवी बी पुरस्कार' प्रदान करण्यात आला. साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. जवाहर मुथा व सकाळ न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कांबळे यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. यावेळी अंकुर साहित्य संघाचे संस्थापक, कार्याध्यक्ष हिंमत शेकोकार इतर पदाधिकारी तुळशीदास बोबडे, डॉ. प्रमोद काकडे, साहेबराव मोरे, जिजाबाराव जाधव, स्थानिक आमदार व्यासपीठावर होते. संमेलनात दुपारी झालेल्या "कवितेची हानी कशी व कोणामुळे' या विषयावरील परिसंवादात श्री. क्षीरसागर सहभागी झाले होते. नवोदित कवी अनुकरण करतात. काही वेळा प्रथितयश कवींच्या कविता स्वतःच्या नावावर खपवितात, त्यांचे वाचन कमी असते, खान्देशात बहिणाबाई चौधरी यांच्यासारखा अष्टाक्षरी छंदात लिहिणाऱ्या कवयित्रीची साधी, सोपी व सरळ कविता अभ्यासली जात नाही आदि कारणांमुळे कवितेचा दर्जा घसरत आहे. कवितेच्या हानीला हे घटक मुख्यत्वे कारणीभूत आहेत, असे मत त्यांनी या परिसंवादात व्यक्त केले.