लोक त्यांचा बोलबाला करतात हो
का यशाने मग तयांच्या जळतात हो ।1
काल त्यांनी पाहिलेले असतेच ना?
भेट होता टाळुनी का पळतात हो ।2
हेत त्यांचा दुष्ट थोडा असणार ना
मनसुबे त्यांचे मलाही कळतात हो ।3
हासुनी ते बोलती पण कुढतात का?
राग तिथला कोण येथे धरतात हो ।4
पेटलेले गाव सारे अफवेतही
आसवे सागर तुझी मग ढळतात हो ।5
Saturday, April 14, 2012
Subscribe to:
Posts (Atom)