Monday, September 14, 2009

बालकविता

१)
खारुताई
झाडावरून खारुताई
खिडकीत बसली
राघवने मग तिला
थोडी भाकरी दिली
खारुताई आनंदाने
नाचू गाऊ लागली
कावळ्याने ते पाहून
तेथे झेप घेतली
खारुताईची भाकरी
कावळ्याने पळविली
राघवची स्वारी मग
उग्गी रुसून बसली

-प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

Saturday, August 22, 2009

शुभेच्छा

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर व परिवार

-------------
हायकू
रानातले फूल
शहरात आले
प्रदूषणाने मेले

अजून मोगरी
फुलाविना कशी
झाडे झाली पिशी

कळ्यांचा बहर
खोडात रुतला
मुळांना काचला
- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

Saturday, July 25, 2009

श्रावण आला

श्रावण आला
अंबरातले निळे झरे
उतरुनी भूमिवरी आले
रम्य मनोहर सजलेले
डोंगरातले नदी - नाले
काठवरच्या तरू लतांना
छेडित कशा या जलधारा
आला श्रावण श्रावण आला
संगे घेऊन सणांची माला

- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

Sunday, July 5, 2009

उरात तराणे

उरात तराणे

कावळ्यांची हूल
पाऊस चाहूल
परी झाले गुल
पाणी कसे?
कसे भोवताली
शिशिराचे गाणे
उरात तराणे
गात कोणी
कोणी आठवावी
विहिरीची खोली
पाण्याने भरलेली
कदाकाळी


वारा
त्या कळीचे फूल होता
मंद वारा वाहतो
अन्‌ फूल झाल्यावरी
तो तिला का टाळतो
गंधवेणा साहताना
हा किनारा ओलावतो
वाळूंनाही तेव्हा का
लाटांचा मोह होतो
ऊर्जा नभाच्या कडेतून
अशी ही प्रवते
कुठे तो सूर्य
प्रसन्न होऊन उगवतो

प्रकाश क्षीरसागर

Friday, February 20, 2009

mazee may

माय कोणाचीही असो

माय कोणाचीही असो
तिला फक्त कळते माया
ममतेचे आवरण तिच्या
काळजाच्या येती ठाया
मायचे चित्त पिल्लांवर
त्यांच्याच रक्षणावर
कोणी काही बोलताच
धावून येते अंगावर
माय मग ती कोणाचीही
माणसाची, पाखरांची
किंवा असूद्या पशूंची
तिची भाषा ही प्रेमाची
स्वतः कष्ट सोसते नि
मुलांना खूप जपते
माय ही मायच असते
नजरेत सौहार्द वसते
दुरूनच तिची जरब
असते पिल्लांवरती
त्यांची तर तिला असे
खूप काळजी दिसराती
आपण खाते खस्ता
सोसते आजारपण
तिच्या नजेरची माया
देते पिल्लाला सोशिकपण
किती आरामात असतो
आपण कुठेही रानावनात
तिचा धाक दुःखालाही
राखणाची करतो बात
तिचे आशीर्वाद येतात
प्रत्येक वेळी कामाला
तिच्या त्यागाची, कष्टाची
किंमत कुठे आम्हाला
नका करू दोस्तहो
बेईमानी तिच्याशी
आपल्यासाठीच तिची
आयुष्याची कसोशी

prakash kshirsagar

Saturday, May 17, 2008

प्रकाश क्षीरसागर यांना कवी बी पुरस्कार प्रदान


चाळीसागव ः येथे झालेल्या अंकुर साहित्य संघातर्फे येथे झालेल्या चाळीसाव्या अंकुर राज्य मराठी साहित्य संमेलनात दै. "गोमन्तक'चे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना त्यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहासाठी प्राप्त झालेला "कवी बी पुरस्कार' प्रदान करताना संमेलनाध्यक्ष प्रा. जवाहर मुथा व सकाळ न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कांबळे व इतर. प्रकाश क्षीरसागर यांना कवी बी पुरस्कार प्रदान पणजी, ता. १७ ः चाळीसगाव (जि. जळगाव) येथे अलीकडेच झालेल्या अंकुर साहित्य संघाच्या राज्य मराठी साहित्य संमेलनात दै. "गोमन्तक'चे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना "कवी बी पुरस्कार' प्रदान करण्यात आला. साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. जवाहर मुथा व सकाळ न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कांबळे यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. यावेळी अंकुर साहित्य संघाचे संस्थापक, कार्याध्यक्ष हिंमत शेकोकार इतर पदाधिकारी तुळशीदास बोबडे, डॉ. प्रमोद काकडे, साहेबराव मोरे, जिजाबाराव जाधव, स्थानिक आमदार व्यासपीठावर होते. संमेलनात दुपारी झालेल्या "कवितेची हानी कशी व कोणामुळे' या विषयावरील परिसंवादात श्री. क्षीरसागर सहभागी झाले होते. नवोदित कवी अनुकरण करतात. काही वेळा प्रथितयश कवींच्या कविता स्वतःच्या नावावर खपवितात, त्यांचे वाचन कमी असते, खान्देशात बहिणाबाई चौधरी यांच्यासारखा अष्टाक्षरी छंदात लिहिणाऱ्या कवयित्रीची साधी, सोपी व सरळ कविता अभ्यासली जात नाही आदि कारणांमुळे कवितेचा दर्जा घसरत आहे. कवितेच्या हानीला हे घटक मुख्यत्वे कारणीभूत आहेत, असे मत त्यांनी या परिसंवादात व्यक्त केले.

Sunday, April 27, 2008

सौ. चित्रा क्षीरसागर यांच्या कविता

सासुरवासीण
लेक चालली सासरी
उभी राहे दारी
विवाहाचे तप झाले
दाटतेच उरी
डोळे पुसते का?
त्या विरहाच्या
यातानाऊरी
भावनांचा पूर
पाठवणी करताना
बाप घरामध्ये माझा
डोळे टिपतो लपून
कष्ट केले संसारात
जपतो अजून
खंतावते कधी पोर
दूर किती राहे
हात सदा पाठीवर फिराताहे

दिंड्या
पंढरीच्या वाटेवर
दिंड्या चालल्या कितिक
वारकरी भजनात
झाडे झेलतात दुःख
बाभळीची झाडे वेडी
सडा फुलांचा घालती
वाटे पिवळी धमक
पायघडी अंथरती
देण्या सावली भक्तांना
बाभळही पुढे सरे
गच्च पानांच्या फांद्यांत
कडुनिंब छत्री

-- सौ. चित्रा क्षीरसागर